Saturday, 1 November 2014

बंडखोरी

 
anti-मुसलमान ज्वलंत पुस्तकं नेहमीच पचनी पडतात असं नाही. पण कधी कधी काही गोष्टी कबूल कराव्याच लागतात. "मोपल्यांचे बंड" वाचलं तेव्हा त्यातल्या वास्तवाने मला हलवून टाकलं. 'लज्जा', 'रक्त लांच्छन', 'ईश्वर मृतात्म्यास शांती देवो', अशी पुस्तक वाचताना किंवा 'पिंजर' सारखा चित्रपट पाहताना अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी. पण "मोपल्यांचे बंड" अजून वेगळं वाटलं. त्यातल्या सावरकरी भाषेचा परिणाम असावा कदाचित; पण करुणा वाटण्याऐवजी चीड आली. हिंदू षंढपणाची. आणि कौतुक वाटलं मुस्लिम समाजाच्या एकीचं.


पुस्तक लिहिलंय ते "मला काय त्याचे" ही प्रवृत्ती, हा दृष्टीकोन बदलून टाकण्यासाठी आणि मला वाटतंय की ते होईल सुद्धा. मित्रमंडळातही मुसलमान असतील तर असू द्यावेत पण जोवर ते इतरांच्या धर्माबद्दल सहिष्णू आहेत तोवरच. आजूबाजूला चाललेल्या घटनांना सामान्य समजून मागे टाकताना आणि दुर्लक्ष करताना त्यांचं स्वरूप भीषण कसा होत जातं याचा प्रत्यय हिंदू धर्माने अनेकदा घेतलेला आहे. "मोपल्यांचे बंड" असाच एक घटनाक्रम फक्त वाचून दाखवतं, पण काहीही न गाळता, न टाळता.

हिंदूंनी कधी मुसलमानांना किंवा क्रीश्चनांना हिंदू धर्मात परावर्तीत करून घेण्याचा प्रयत्न केलेला आढळत नाही. मुसलमान हिंदू झाल्याच एकच उदाहरण माझ्याही समोर आहे; ते आहे महम्मद कुलीखान जेव्हा "परत" नेताजी पालकर झाले ते. पण तेसुद्धा मुळातल्या हिंदूलाच परत हिंदू करण्यासाठी केलेलं.
हिंदू राजे आणि नेते याबाबत भलतेच उदार. पण या औदार्याचा इतर धर्मांनी नेहमीच गैरअर्थ घेतलेला दिसतो. हिंदू जबरदस्ती करत नाहीत म्हणजे कोणीही येउन आम्हाला टपली मारून जावं असं नाही. पण इतर धर्म हे सोयीस्कर प्रकारे विसरलेले दिसतात. ताज महालापासूनच हिंदू वैदिक वास्तूंना आणि वस्तूंना आपल्या नावावर करून श्रेय लाटण्याचे प्रकार असंख्य वेळा झालेले आहेत.

"मोपल्यांचे बंड" साठी स्थळ आहे ते दक्षिण भारतातील. उत्तमोत्तम आणि एकाहून एक प्रसिद्ध हिंदू देवस्थानं असलेल्या, पण तरीही जेथील हिंदूंच्या वेदना सहजपणे उत्तरेला ऐकू जात नाहीत अशा प्रदेशात. हा ही योगायोग म्हणायचा बहुतेक. कित्येक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या या गोष्टी किती लोकांनी कानावरसुद्धा घेतल्या असतील माहित नाही. नमूद करणे दूरच.

स्वातंत्र्याच्या आसपास सीमेवर अशा कित्येक घटना घडलेल्या अनेकदा लोकांसमोर आलेल्या आहेत. या न त्या अनेक माध्यमातून. पण स्वातंत्र्यापूर्वीच जन्म झालेल्या आणि वेग घेणाऱ्या घटनांना हिंदू समाजाने कधी मनावर घेतलंच नाही, हे इतक्या परखडपणे सांगायला सावरकरच हवेत.

आम्ही स्वतः दुसर्यांचा खोड्या काढत नाही याचा हिंदूंना सार्थ अभिमान आहे; यावर पुस्तक सरळच बोट ठेवतं. पण कमीतकमी इतरेजन खोड्या काढीत असतील तर ते कानाआड करून आणि हातावर हात धरून स्वस्थ तरी बसू नये. बांग्लादेशी हिंदूंच्या व्यथा समजून घेऊन व्यक्त करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एका मुस्लीम लेखिकेला भारतात शरण घ्यावी लागते, आणि तरीही आमचा हिंदूबहुल देश त्यामागचं गांभीर्य समजून घेऊ शकला नाही. 

अर्थात "मोपल्यांचे बंड" हे हिंदूंच्या निष्क्रियतेइतकंच त्यांच्यातील स्वार्थी दुहीवर केलेलं विधान आहे. इतिहासाची साक्ष देऊन हिंदूंच्या धर्माभिमानाला आणि एकजूट शस्त्रसज्जतेला साद घालणारं रणशिंग आहे जणू.
सावरकरी भाषेमुळे त्याला धार आहे, स्पष्टवक्तेपणा आहे, नेमकेपणा आहे आणि अचूक नेमही आहे.

No comments:

Post a Comment