Saturday, 1 November 2014

बंडखोरी

 
anti-मुसलमान ज्वलंत पुस्तकं नेहमीच पचनी पडतात असं नाही. पण कधी कधी काही गोष्टी कबूल कराव्याच लागतात. "मोपल्यांचे बंड" वाचलं तेव्हा त्यातल्या वास्तवाने मला हलवून टाकलं. 'लज्जा', 'रक्त लांच्छन', 'ईश्वर मृतात्म्यास शांती देवो', अशी पुस्तक वाचताना किंवा 'पिंजर' सारखा चित्रपट पाहताना अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी. पण "मोपल्यांचे बंड" अजून वेगळं वाटलं. त्यातल्या सावरकरी भाषेचा परिणाम असावा कदाचित; पण करुणा वाटण्याऐवजी चीड आली. हिंदू षंढपणाची. आणि कौतुक वाटलं मुस्लिम समाजाच्या एकीचं.


पुस्तक लिहिलंय ते "मला काय त्याचे" ही प्रवृत्ती, हा दृष्टीकोन बदलून टाकण्यासाठी आणि मला वाटतंय की ते होईल सुद्धा. मित्रमंडळातही मुसलमान असतील तर असू द्यावेत पण जोवर ते इतरांच्या धर्माबद्दल सहिष्णू आहेत तोवरच. आजूबाजूला चाललेल्या घटनांना सामान्य समजून मागे टाकताना आणि दुर्लक्ष करताना त्यांचं स्वरूप भीषण कसा होत जातं याचा प्रत्यय हिंदू धर्माने अनेकदा घेतलेला आहे. "मोपल्यांचे बंड" असाच एक घटनाक्रम फक्त वाचून दाखवतं, पण काहीही न गाळता, न टाळता.

हिंदूंनी कधी मुसलमानांना किंवा क्रीश्चनांना हिंदू धर्मात परावर्तीत करून घेण्याचा प्रयत्न केलेला आढळत नाही. मुसलमान हिंदू झाल्याच एकच उदाहरण माझ्याही समोर आहे; ते आहे महम्मद कुलीखान जेव्हा "परत" नेताजी पालकर झाले ते. पण तेसुद्धा मुळातल्या हिंदूलाच परत हिंदू करण्यासाठी केलेलं.
हिंदू राजे आणि नेते याबाबत भलतेच उदार. पण या औदार्याचा इतर धर्मांनी नेहमीच गैरअर्थ घेतलेला दिसतो. हिंदू जबरदस्ती करत नाहीत म्हणजे कोणीही येउन आम्हाला टपली मारून जावं असं नाही. पण इतर धर्म हे सोयीस्कर प्रकारे विसरलेले दिसतात. ताज महालापासूनच हिंदू वैदिक वास्तूंना आणि वस्तूंना आपल्या नावावर करून श्रेय लाटण्याचे प्रकार असंख्य वेळा झालेले आहेत.

"मोपल्यांचे बंड" साठी स्थळ आहे ते दक्षिण भारतातील. उत्तमोत्तम आणि एकाहून एक प्रसिद्ध हिंदू देवस्थानं असलेल्या, पण तरीही जेथील हिंदूंच्या वेदना सहजपणे उत्तरेला ऐकू जात नाहीत अशा प्रदेशात. हा ही योगायोग म्हणायचा बहुतेक. कित्येक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या या गोष्टी किती लोकांनी कानावरसुद्धा घेतल्या असतील माहित नाही. नमूद करणे दूरच.

स्वातंत्र्याच्या आसपास सीमेवर अशा कित्येक घटना घडलेल्या अनेकदा लोकांसमोर आलेल्या आहेत. या न त्या अनेक माध्यमातून. पण स्वातंत्र्यापूर्वीच जन्म झालेल्या आणि वेग घेणाऱ्या घटनांना हिंदू समाजाने कधी मनावर घेतलंच नाही, हे इतक्या परखडपणे सांगायला सावरकरच हवेत.

आम्ही स्वतः दुसर्यांचा खोड्या काढत नाही याचा हिंदूंना सार्थ अभिमान आहे; यावर पुस्तक सरळच बोट ठेवतं. पण कमीतकमी इतरेजन खोड्या काढीत असतील तर ते कानाआड करून आणि हातावर हात धरून स्वस्थ तरी बसू नये. बांग्लादेशी हिंदूंच्या व्यथा समजून घेऊन व्यक्त करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एका मुस्लीम लेखिकेला भारतात शरण घ्यावी लागते, आणि तरीही आमचा हिंदूबहुल देश त्यामागचं गांभीर्य समजून घेऊ शकला नाही. 

अर्थात "मोपल्यांचे बंड" हे हिंदूंच्या निष्क्रियतेइतकंच त्यांच्यातील स्वार्थी दुहीवर केलेलं विधान आहे. इतिहासाची साक्ष देऊन हिंदूंच्या धर्माभिमानाला आणि एकजूट शस्त्रसज्जतेला साद घालणारं रणशिंग आहे जणू.
सावरकरी भाषेमुळे त्याला धार आहे, स्पष्टवक्तेपणा आहे, नेमकेपणा आहे आणि अचूक नेमही आहे.

सोनेरी चंदेरी


पुस्तकाच्या मलपृष्ठावर पुस्तकाची ओळख करून देताना म्हटलंय, "सेलिब्रिटी मधलं माणूसपण शोधण्याचं, टिपण्याच आणि शब्दांच्या माध्यमातून वाचकापर्यंत पोचवण्याचं कसब ललिता ताम्हणे  यांना साधलंय." पुस्तकाला याचा "बोलका प्रत्यय" म्हटलंय. जे वाचताना आपल्याला शंभर टक्के पटत. किंबहुना पुन्हा पुन्हा पटत राहत.

मुळात चंदेरी दुनियेमागच्या कथांमध्ये सामान्यांना भयंकर रस. त्यात प्रस्तावनेतच सरळ सरळ सांगून टाकलंय की यात गुपितच गुपितं आहेत. पण जसजसं एकेक पान उलटत गेले तसं माझ्याच लक्षात आलं, गुपितं समजण्याची हौस हा किती क्षुद्रपणा आहे. त्या देखण्या चेहऱ्यामागची तितकीच किंवा त्याहीपेक्षा देखणी माणसं नजरेस पडू लागली आणि मी आपोआप त्यात हरवत गेले. मीनाकुमारी, दीप्ती नवल यांच्या कविता त्यांच्या अभिनयाइतक्याच सुंदर असतील असं मला माहीतच नव्हतं. खरं तर त्यांच्या कविताही आहेत हेच माहित नव्हतं.


लोग एकही नजरसे देखते हैं 
औरत और मर्द के रिश्ते को 
क्योंकी उसे नाम दे सकते हैं ना 
नामों से बंधे बेचारे यह लोग 

त्यांच्या प्रेमाच्या कथा ऐकलेल्या होत्या आणि त्याचं नवल, कुतूहल, आकर्षण, कौतुक असं सगळं असून सुद्धा त्यांच्या त्या प्रेमाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलून गेला. या सगळ्याच्या बरोबरचा आणि पलीकडचा एक आदर आला.

कलाकार मूडी असतात, लहरी असतात असं काय काय ऐकत आले होते मी. चुकून एखादेवेळी विचार यायचा त्यांच्या माणूस असण्याचा; पण तो तितकाच चुकार असलेला विचार, क्षणात विरूनसुद्धा जायचा. या पुस्तकाने मात्र त्यांच्या माणूसपणाचं भान ठेवण्याची खात्री पटवली आणि महत्त्वसुद्धा. त्यांच्या स्वभावाला असलेल्या आणि  क्वचितच सामान्यांच्या समोर आलेल्या सुंदर छटा सहज लक्षात आणून दिल्या. त्यांच्या लहरी, त्यांचे मूड्स, यामागे त्यांचीही काही अतिशय अस्वस्थ कारणे असू शकतात; अगदी जशी तुमची-आमची असतात अशीच. त्यांच्या आयुष्यालाही तसेच चढ उतार असतात. त्यांनाही तशीच जिद्द ठेवावी लागते. आणि एवढ्या खटाटोपानंतरही, कधी कधी त्यांनाही अपयशाचा सामना करावा लागतो.

असं म्हणतात, "Winner is just like everyone else, only the one who didn't quit". या पुस्तकाने माझी या वाक्याशी एक नवी ओळख करून दिली. मनाला भावणाऱ्या या सेलेब्रिटीजचे हे अगदी वेगळे पैलू. म्हटलं तर जिद्दी म्हटलं तर हळवे. मानी. वक्तशीर, शिस्तीचे, वचन पाळणारे आणि दिलदारपणे अटी मोडणारे सुद्धा. कलाकार आहेत म्हणून की कोणास ठाऊक, पण सगळेच संवेदनशील. 


जब बहुत कुछ कहने को जी चाहता है ना 
तब कुछ भी कहने को जी नहीं चाहता 

खरं तर सगळेच लेख त्या त्या सेलेब्रिटीजना उलगडत नेणारे आहेत पण त्यातही, स्पर्शून जाणारे म्हणजे "कमाल अमरोही", "सायरा बानू", "हेमा मालिनी" "रेखा" आणि "रंजना". 
यांच्या स्वभावाच्या अशा बाजू नजरेस पडून थक्क झाले मी. माणूस असाही असू शकतो, इतका मोठा..?? दिसतो, वाटतो किंवा भासतो, दाखवतो त्यापेक्षा इतका वेगळा...
वाचकांच्याच सुदैवाने हे सारे लोक लेखिकेशी जवळीकीने, मोकळेपणाने बोलू शकले असं म्हणायला हवं खरं म्हणजे. कदाचित यामागे ललीताजींची मुलाखतीची पद्धत असावी. फक्त एक "स्टोरी" म्हणून कलाकारांकडे पाहण्याऐवजी, एक माणूस म्हणून त्यांच्याकडे आणि त्यांच्या वैयक्तिक तसच व्यावसायिक आयुष्याकडे त्या पाहत आल्या आहेत. मुखवटे बाजूला ठेवून एखाद्याला समजून घेण्यासाठी काही तासांपेक्षा कमीत कमी काही दिवस देणं आवश्यक आहे; किंबहुना, तसं समजून घेतल्याशिवाय एखाद्याबद्दल जाहीर विधान करणं अयोग्य आहे हे त्यांनी नेहमीच सांभाळलेल दिसतं. 

स्मिता पाटील, नूतन, तनुजा, मीनाक्षी शेषाद्री, दीप्ती नवल, गौतम राजाध्यक्ष, यांच्यावरील लेखातून ललीताजींची त्यांच्या बद्दलची आत्मीयता आणि मैत्री स्पष्ट जाणवत राहते. जवळच्या मित्रमैत्रीणींबद्दल बोलताना त्यांचाही हात सैलावतोच. या 'मुलाखतीपलीकडच्या' माणसांमध्ये आपणच आपल्या नकळत गुंतत जातो. त्यांच्यातले कलाकार आणि सेलेब्रिटीज मागे राहून त्यांच्यातलेही साधेसरळ मैत्र आपल्या नजरेस पडू लागतं. हे पुस्तक या सगळ्यांच्या प्रसिद्धीच्या प्रवासाचं, त्यांच्या भावनिक चढउतारांच आणि कष्टाचं सुद्धा साक्षीदार बनते, आणि आपल्यालाही बनवत. चंदेरी दुनियेतल्या माणसांचं हे सोनेरी पाणी पाहून एकदम खूप छान वाटायला लागतं.

ही माणसं काही अजूनही आहेत, काही मात्र निघून गेलेली. प्रेरणाही देतात आणि संवेदनाही. "They should get their dues" ही भावनाही. लेखांच्या शेवटी मात्र मनात "माणूस" म्हणूनच घर करतात.
मीनाकुमारीच्या या ओळी सुरुवातीलाच भेटतात आणि शेवटानंतरही सोबत करतात.


चाँद तन्हा है आसमां तन्हा 
दिल मिला है कहाँ कहाँ तन्हा 
जिन्दगी क्या इसीको कहते हैं 
जिस्म तन्हा है और जां तन्हा 
राह देखा करेगा सदियों तक 
छोड़ जाएँगे ये जहाँ तन्हा